शिरीष महाराजांचे आत्महत्येपूर्वीचे हृदयद्रावक शब्द: तुझं आयुष्य…!!!
पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे, या दुर्दैवी घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्येपूर्वी चार सुसाईड नोट लिहिल्या होत्या, त्या आता पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.
मोरे यांनी काही पत्र लिहून ठेवली होतीत, ज्यामध्ये आई-वडील, बहिण आणि त्यांच्या मित्र मंडळींसाठी लिहिली आहेत. येत्या २० एप्रिलला मोरे यांचा विवाह होणार होता. काही दिवस बाकी असताना त्यांनी स्वत:ला संपवलं. यामधील एक पत्र त्यांनी होणाऱ्या पत्नीसाठी लिहिले असून त्यामध्ये त्यांनी माफी मागितली आहे.
खरंतर तुझा आता कुठे हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठे फुलायला सुरुवात झाली होती न मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागतो, मला माफ कर. आयुष्यात सर्वात जास्त अपराधी मी कुणाचा असेल तर तुझा. तुला न्याय नाही देऊ शकतो. माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस, माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला, तर माझी वाट पाहिलीस, माझ्या संघर्षात उभी राहणाऱ्या माझ्या सखे, माझ्या चांगले वेळेची हकदार होतीस तू. माफ कर, तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय, असं शिरीष महाराज मोरे म्हणाले.
हे देखील वाचा: संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या, धक्कादायक घटनेने उडाली खळबळ…
कुंभमेळा राहिला, वारी राहिली, किल्ले राहिले, भारतदर्शन राहिलं. सगळंच तर राहीलं. मी काहीही न देता सुद्धा माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू. खूप गोड आहेस तू. निस्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल पण जप स्वत:ला एवढा काळ थांबलीस, आता मीच नसेल थांबू नको. पुढे जा. खूप मोठी हो आणि हो, खूप झाले कष्ट, आता work from home हो, खूप वेळा माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्या, मला माफ कर तुझाच अहो शिरीष मोरे. आमच्या नवरीबाईची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त करून मी चाललो आहे. खूप गोड आहे प्रियांका, तिला कधी वेळच देता आला नाही. परंतु तिच्यासाठी आता चांगला मुलगा बघा. नाहीतर ती लग्न करणार नाही, अशी विनंतीही पत्रात शिरीष मोरे यांनी मित्रांना केली आहे.
प्रिय आकाश, मनिष, अक्षय, अजय… खरंतर युद्धातून पळ काढणाऱ्याने मदत मागणे चूकच. पण कृपा करुन आई-वडिलांना सांभाळा. दिदीचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या. डोक्यावर खूप कर्ज झालंय. त्याची सारी यादी देतोय. गाडी विकूनही काही कर्ज राहील. त्यात तुम्ही सर्वांनी मदत करुन आई-वडिलांना जपा. मी हे कर्ज सहज फेडू शकलो असतो असं वाटत असेल, पण आता ताकद नाही लढण्याची. माफ करा, असं मोरेंनी पत्रात म्हटलंय.
‘युद्ध हरलो, मला माफ करा,’ असे म्हणत आई-वडील, मित्र आणि होणारी पत्नी यांच्या नावाने शिरीष महाराज मोरे यांनी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या (सुसाइड नोट) समोर आल्या आहेत. या चिठ्ठ्यांमधून त्यांनी सर्वांचीच माफी मागितली आहे.












