मोठी बातमी..! पुण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत भरभरून निधी; अभय योजनेलाही मुदतवाढ
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. पार पडलेल्या बैठकीत महसूल, जलसंपदा आणि मृदा व जलसंधारण या विभागांच्यादृष्टीने महत्त्वाचे तीन निर्णय घेण्यात आले आहेत. याबरोबरच, अभय योजनेला एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेतला आहे. या राज्य मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पासाठी ३१५ कोटी ५ लाख रूपये
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. याबैठकीत पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाच्या (ता. मुळशी) गळती प्रतिबंधक उपाययोजनेची अपूर्ण राहिलेली सर्व कामे व धरण मजबुतीकरणाच्या कामांसाठी ३१५ कोटी ५ लाख रूपये मंजूर केले आहेत.
महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यातील कोयना जलाशयासाठी १७० कोटी रुपये
याबरोबरच, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामधील बंधारे बांधण्याच्या २५ प्रकल्पांसाठी १७० कोटी रूपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे.
अभय योजनेला एका वर्षाची मुदत वाढ
या बरोबरच, मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचा निर्णय म्हणजे, राज्याच्या महसूल विभागांतर्गत शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक नियोजनासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाड्याने दिलेल्या शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी भोगवटादार वर्ग- १ मध्ये रुपांतरीत करताना कमी किंमत आकारण्या संबंधित असलेल्या अभय योजनेला अजून एका वर्षांची मुदतवाढ.
.












